दुष्काळ परिषदेस प्रचंड गर्दी.

lokmat samachar
सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या पुढाकाराने दुष्काळ परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला माजी मुख्यमंत्री व खा. अशोकरावजी चव्हाण साहेब, आ. माणिकरावजी ठाकरे, विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील, सेवादल चे जिल्हाअध्यक्ष विलासजी औताडे, आमदार सुभाषजी झांबड मा.आ.कल्याणरावजी काळे ,जालना लोकसभा युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष अब्दुल समीर इत्यादी नेते हजार होते. या परिषदेमध्ये लोकांशी बोलतांना अशोकरावजी चव्हाण साहेब म्हणाले की, युती सरकारने मोठ्या प्रमाणत होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला मिळणारा कमी भाव व तसेच अन्य मुद्यावर या परिषदेमध्ये प्रकाश टाकण्यात आला.