विधानसभेत आवाज उठवू – आमदार अब्दुल सत्तार.


सिल्लोड येथे ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या अभियानाची औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात विधानसभेत आवाज उठवू असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी असंख्य शेतकऱ्यांनी कर्ज माफी न झाल्याचे फॉर्म भरले.