प्रसिध्दीपत्रक

आ. अब्दुल सत्तार यांची आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सांत्वनपर भेट.

मागील गुरुवारी सिल्लोड तालुक्यातील पालोद गावातील भाऊराव पालोदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आ. अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व सदरील कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपयाचा धनादेश दिला.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार साहेबांनी केली आत्महत्याग्रस्त कुटुंबीयाची मदत.

सिल्लोड तालुक्यातील पालोद गावातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आ. अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व सदरील कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपयाचा धनादेश दिला.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार यांची जपानुष्ठान समाप्ती सोहळ्यास उपस्थिती.

आ. अब्दुल सत्तार यांना सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथे सोमेश्वर गिरी महाराज (तपोवन) यांच्या प्रेरणेने सुरु असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याच्या समाप्ती कार्यक्रमाच्या समाप्ती सोहळ्यात आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी आ. सत्तार साहेबांनी जपानुष्ठान संबधी उपस्थित नगरिकंशी चर्चा केली.

अधिक वाचा

व्यसनमुक्त पिढीसाठी संत साहित्याचे वाचन आवश्यक- अब्दुल सत्तार.

सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथे सोमेश्वर गिरी महाराज (तपोवन) यांच्या प्रेरणेने सुरु असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याच्या समाप्ती कार्यक्रमात आ. अब्दुल सत्तार यांना आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी बोलतांना आ. सत्तार साहेब म्हणाले की, व्यसन हे समाजाला लागलेला कलंक असून, सुसंस्कृत व व्यसनमुक्त पिढी घडविण्यासाठी तरुणांनी संत साहित्याचे वाचन करून धार्मिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी …

अधिक वाचा

साहित्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मांडणी व्हावी- आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड येथे रविवारी एकदिवसीय झेप साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ‘मातोश्री हरणाबाई जाधव’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. लेखकांनी साहित्यातून शेतकरी व तसेच श्रमिकांच्या प्रश्नांची मांडणी करून त्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, त्यांच्यात सकारात्मक जाणीव रुजाव्यात, या दृष्टीने साहित्य निर्मिती व्हावी अशी अपेक्षा आमदार …

अधिक वाचा

कॉंग्रेसचा हल्ला बोल मोर्चा.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुर येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने भव्य हल्ला बोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व शेतमालाला भाव देण्याची जोरदार मागणी कॉंग्रेस च्या वतीने करण्यात आली.

अधिक वाचा

शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी- आ. अब्दुल सत्तार

या वर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी बाळापुर येथील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली असता शेतात उभ्या असलेल्या पिकांची सोंगणी देखील परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पिक न सोंगताच सोडून दिले आहे. यासंदर्भामध्ये आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सरकारने केवळ घोषणाबाजी न करता तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर द्यावी.

अधिक वाचा

ग्रामीण, तरुण साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे- अब्दुल सत्तार

सिल्लोड येथे रविवारी एकदिवसीय झेप साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ‘मातोश्री हरणाबाई जाधव’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सिल्लोड तालुक्यातील युवक लेखकांसाठी त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे त्यामुळे जिल्हास्तरीय साहित्य …

अधिक वाचा

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवा- आ. अब्दुल सत्तार

सिल्लोड तालुक्यातील कोळीवाडी जि.प. शाळेमध्ये गटसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल सत्तार साहेबांना निमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी बोलतांना अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, गेल्या काही वर्षापासून मुलांना खाजगी शाळेत घालण्यासाठी पालकांचा कल वाढलेला आहे.त्यामुळे जि.प. शाळेतील मुलांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी जि.प. शाळेतील शिक्षकांनी …

अधिक वाचा

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी.

सरकार ने सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला असून शाळेमध्ये पुस्तकांपासून ते मध्यान्ह भोजना पर्यंत व्यवस्था केली आहे, शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांची आल्यामुळे त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा स्तर वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले आहे.

अधिक वाचा