प्रसिध्दीपत्रक

वीज पाणीप्रश्नी तातडीने उपाययोजना करा- अब्दुल सत्तार

आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील पाणी व वीज प्रश्नासंदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्याची आढावा बैठक घेतली. पाणी व वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना ही यावेळी अब्दुल सत्तार साहेबांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अधिक वाचा

अब्दुल सत्तारांनी केली ग्रामसेवक, सरपंचाशी चर्चा.

आमदार अब्दुल सत्तार यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, मंडळ अधिकारी, व कृषीअधिकारी यांची सिल्लोड तहसीलच्या प्रांगणात बैठक घेवून चर्चा केली गावातील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही ह्यावेळी अब्दुल सत्तार यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अधिक वाचा

पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी त्वरित उपाययोजना करा- अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार साहेब आढावा बैठकीमध्ये बोलतानां म्हणाले की, ग्रामसेवक व तलाठी गावाचा केंद्र बिंदू असून प्रशासन व लोकप्रतिनिधींचा समन्वय असणे खूप महत्वाचे आहे.दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा, वीज इत्यादी गोष्टींची पूर्तता होणे गरजेचे आहे. शेतातील उभी पिके पावसाअभावी वाया गेली आहेत. म्हणून अधिकाऱ्यांना सूचना देतांना अब्दुल सत्तार साहेब पुढे म्हणाले की, संबधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तालुक्यातील …

अधिक वाचा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवून देणार- अब्दुल सत्तार

मागील दोन महिन्यापासून खंडित वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. ह्या वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आपण येत्या १० तारखेला विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती आ.अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.

अधिक वाचा

वीज, पाणीप्रश्नी लक्ष द्या- अब्दुल सत्तार

उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत अब्दुल सत्तार बोलत होते. सिल्लोड तालुक्यात कमी झालेल्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या परिस्थिती मध्ये वीज व पाणीपुरवठ्याबाबत संबधित यंत्रणेने लक्ष द्यावे अशी सूचनाही त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

अधिक वाचा

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच- अब्दुल सत्तार

सिल्लोड व सोयगाव तालुक्यामध्ये ३० ते ३५ टक्यापेक्षा कमी आणेवारी सदृश्य परिस्थिती आहे. असंख्य अडचणी असताना आता आणखीन नवीन दुष्काळरुपी संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे सिल्लोड व सोयगाव तालुका ‘दुष्काळग्रस्त तालुका’ घोषित झालाच पाहिजे या मागणीसाठी आपण आंदोलन करणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच असे प्रतिपादन अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या शेतकरी आढावा बैठकीमध्ये …

अधिक वाचा

आ.सत्तार यांना गटनेतेपदी निवड करण्याची मागणी.

सर्व सामन्याचे नेते म्हणून अब्दुल सत्तारांना ओळखले जाते. औरंगाबाद,जालना व बीड या तीन जिल्ह्यातून कॉंग्रेस पक्षाचे एकमेव आमदार अब्दुल सत्तार निवडून आले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचा बुरुज अबाधित ठेवणाऱ्या अब्दुल सत्तार यांची कॉंग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करावी अशी मागणी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी पक्षश्रेष्ठी सोनियागांधी यांच्याकडे केली आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक.

अत्यल्प झालेल्या पावसामुळे सिल्लोड व सोयगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून शेतकऱ्यांसमोर दुष्काळ आ वासून उभा आहे. ह्या दुष्काळी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी सिल्लोड येथील ‘नर्मदाबाई मंगल कार्यालय’ येथे आज सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन केले होते.

अधिक वाचा

दुष्काळसदृश परिस्थितीवर अब्दुल सत्तार यांची शेतकऱ्यांशी चर्चा.

सिल्लोड व सोयगांव तालुक्यात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी आ. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत सिल्लोड शहरातील नर्मदाबाई मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा

सिल्लोड मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कार्य करणार- आ.अब्दुल सत्तार.!

विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील जनतेचे आभार मानण्यासाठी घाटनांद्रा येथे दौरा केला. आपण सर्वांनी मिळून मतदारसंघाचा विकास करायचा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

अधिक वाचा