पाणी बचतीसाठी सिमेंट बंधारे आवश्यक- आ. अब्दुल सत्तार.

Divya Marathi
आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियातंर्गत कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, सिल्लोड व सोयगाव तालुक्यात पाऊस पडला तरी भौगोलिक परिस्थितीमुळे पावसाचे पाणी वाहून जाते. जमिनीत पाणी टिकत नसल्याने पाणी साठविण्यासाठी सिमेंट बांधाची कामे होणे अत्यंत आवश्यक आहे.