सोयगाव तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने विविध योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१४ ते २०१५ मध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, औषधी इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले होते. परंतु सदरील साहित्य संबधित शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही या संदर्भामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी उपविभागीय कृषीअधिकारी यांना चौकशी चे आदेश दिले आहेत.