सिल्लोड व सोयगांव तालुक्यात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी आ. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत सिल्लोड शहरातील नर्मदाबाई मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.