बियर कंपन्याचा पाणी पुरवठा बंद करण्याची कॉंग्रेसची मागणी

Bhaskar (2)
मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई असून औरंगाबादेतील मद्य कारखान्यांना मद्य निर्मितीसाठी लागणारा पाणी पुरवठा काही महिने बंद करावा अशी आग्रही मागणी औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढलेल्या आंदोलनामध्ये कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली यावेळी औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.