महसूल,ग्रामविकास बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांचा कोकण दौरा.

कोकणातील ग्रामीण भागातील विविध प्रश्न, खारभूमीचे प्रश्न, बंदरे, जेट्टी, मच्छीमारांचे प्रश्न, अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेले नुकसान, माझे कुटुंब माझी जबाबदारी अशा विविध विषयांचा आढावा व पाहणी करण्यासाठी महसूल, ग्रामविकास,बंदरे, खारजमिनी विकास, विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांनी कोकण विभागाचा दौरा केला. कोकणातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी शासनदरबारी पुढाकार घेतला. तसेच ठाकरे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे ना. अब्दुल सत्तार साहेब माध्यमांशी बोलतांना म्हणाले.