दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करायला हवा असे आवाहन आ.अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केले आहे. दुष्काळ स्थितीला धास्तावून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सिल्लोड तालुक्यात काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, या पार्श्वभूमीवर आ. अब्दुल सत्तार यांनी मतदार संघातील भवन सर्कल मधील विविध गावांना भेटी देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला.