दुष्काळाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले अनुदान अत्यंत कमी असून, हा शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्यायच आहे. ह्याचा जाब सरकारला विचारण्यासाठी शेतकऱ्यांनी २३ तारखेला होणाऱ्या दुष्काळ परिषदेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.