साहित्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मांडणी व्हावी- आ. अब्दुल सत्तार.

Sakal
सिल्लोड येथे रविवारी एकदिवसीय झेप साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ‘मातोश्री हरणाबाई जाधव’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. लेखकांनी साहित्यातून शेतकरी व तसेच श्रमिकांच्या प्रश्नांची मांडणी करून त्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, त्यांच्यात सकारात्मक जाणीव रुजाव्यात, या दृष्टीने साहित्य निर्मिती व्हावी अशी अपेक्षा आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.