पैठण तालुक्यातील नंदर येथील वीरभद्र नदीच्या खोलीकरण कामाचे उद्घाटन विधानसभाचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला असून शेतकऱ्यांच्या समस्या व दुष्काळ परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.