आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सिल्लोड येथील तहसील कार्यालयामध्ये खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेब शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले की आत्महत्या करणे हा दुष्काळी परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने शेतकरी बांधवांनी धीर धरून खरीप हंगामाला सामोरे जावे.