कॉंग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी.

Lokmat Samachar
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने औरंगाबाद येथे मराठवाडा दुष्काळ परिषद आयोजित केली होती. या परिषेदेमध्ये कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपा सरकार निकामी असल्याचे सांगत भाजपा सरकार मध्ये ‘शहरी’ मंत्री असल्यामुळे त्यांना शेतकऱ्याच्या वेदना कशा कळणार असा प्रश्नही उपस्थित केला. भाजपा सरकार ने शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर केली नाही तर कॉंग्रेसच्या वतीने आगामी ८ तारखेला नागपूर येथे हल्ला बोल मोर्चा काढण्यात येणार आहे.