भाजपा सरकारने बहुमत सिद्ध करावे,तालुका कॉंग्रेस कमिटीची राज्यपालांकडे मागणी.

Anand Nagari
महाराष्ट्र विधानसभेमध्ये दिनांक १२ नोव्हेंबर रोजी भारतीय पक्षाद्वारे मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावामध्ये भारतीय घटनेच्या तरतुदीचा भंग झाला असून भारतीय जनता पक्षाने राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत सिध्द केले नाही त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला पुन्हा बहुमत सिध्द करण्याचे आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राज्यपालांना देण्यात आले आहेत. सदरील निवेदनावर अब्दुल सत्तार साहेबांसाहित अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत.