जनसंपर्क वाढविणे आवश्यक- आ.अब्दुल सत्तार

mata 2
तापडिया नाट्यगृह औरंगाबाद येथे प्रदेशाध्यक्ष श्री माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील गंभीर दुष्काळ परिस्थितीवर पक्षीय पातळीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दुष्काळी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी मध्ये बोलतांना आ. अब्दुल सत्तार म्हणाले की, राजकारणात धार्मिक तेढ वाढली असून त्याचा फायदा भाजपा, शिवसेना इत्यादी पक्ष घेत आहेत त्यामुळे हे थांबवून आपल्याला पराभवामुळे खचून न जाता जास्तीत जास्त जनसंपर्क वाढवून मागील चुका सुधारणे गरजेचे आहे.