भाजपा सरकार कडून शेतकऱ्यांना मदतीची केवळ घोषणा- आ. अब्दुल सत्तार.
पैठण येथे तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी दुष्काळ परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, भाजपा सरकार केवळ मदतीची घोषणा करीत असून प्रत्यक्षात मात्र काहीच मदत करीत नाहीत.