भाजपा सरकार शेतकरी विरोधी- आ. अब्दुल सत्तार.

Sakal
युवक कॉंग्रेसतर्फे जालना लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या राहुल गांधी संदेश पदयात्रेच्या समारोप निमित्त सिल्लोड येथे अध्यक्षीय भाषणात बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की खोटी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एक वर्षाच्या काळात एकही कल्याणकारी निर्णय घेतला नसून भूमीअधिग्रहण कायदा करून पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.