शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच- अब्दुल सत्तार

Anand Nagari (2)
सिल्लोड व सोयगाव तालुक्यामध्ये ३० ते ३५ टक्यापेक्षा कमी आणेवारी सदृश्य परिस्थिती आहे. असंख्य अडचणी असताना आता आणखीन नवीन दुष्काळरुपी संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे सिल्लोड व सोयगाव तालुका ‘दुष्काळग्रस्त तालुका’ घोषित झालाच पाहिजे या मागणीसाठी आपण आंदोलन करणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच असे प्रतिपादन अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या शेतकरी आढावा बैठकीमध्ये केले आहे.