ग्रामीण, तरुण साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे- अब्दुल सत्तार

Lokmat
सिल्लोड येथे रविवारी एकदिवसीय झेप साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ‘मातोश्री हरणाबाई जाधव’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सिल्लोड तालुक्यातील युवक लेखकांसाठी त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे त्यामुळे जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात यावे.