विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवा- आ. अब्दुल सत्तार

Punya Nagari
सिल्लोड तालुक्यातील कोळीवाडी जि.प. शाळेमध्ये गटसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल सत्तार साहेबांना निमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी बोलतांना अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, गेल्या काही वर्षापासून मुलांना खाजगी शाळेत घालण्यासाठी पालकांचा कल वाढलेला आहे.त्यामुळे जि.प. शाळेतील मुलांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी जि.प. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी केले.