सिल्लोडच्या नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. मात्र आजची स्थिती पाहिली तर यात मोठा बदल मा. आ. अब्दुल सत्तार यांनी केलेला दिसून येतो. आ. अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे पाण्याचे सुनियोजन करून व वितरण व्यवस्थेत सुसूत्रता आणून पाणी टंचाई जाणवू दिली नाही. अत्यंत कडक उन्हाळ्यातही तहानलेल्या शहराला मुबलक पाणी मिळाले ही नोंद घेण्यासारखी आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत णढऊडडचढ योजने अंतर्गत वाढीव जलशुद्धीकरण केंद्र २ॠडठ व तसेच ४० लाख लिटर क्षमतेचे ५ नवीन जलकुंभ उभारून कार्यान्वित करण्यात आले आहे. आज शहरातील जलशुद्धीकरण केंद्र, भराडी रोड, टिळकनगर, शिक्षक कॉलनी, इदगाह, भोकरदन रोड, रजाळवाडी व म्हसोबा मंदिरामागे या ठिकाणी म्हणजेच शहराच्या चारही दिशेला पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. पाईप लाईन वितरण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे. आज शहरामध्ये ७२ कि.मी. पाईट लाईनचे विक्रमी काम करण्यात आले आहे. या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागामध्ये प्रत्येक कुटुंबांना नळ कनेक्शन देऊन स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी देण्याचे काम न.प. ने केले आहे.