मागील दोन महिन्यापासून खंडित वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. ह्या वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आपण येत्या १० तारखेला विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती आ.अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.
अधिक वाचाArchive for नोव्हेंबर, 2014
वीज, पाणीप्रश्नी लक्ष द्या- अब्दुल सत्तार
उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत अब्दुल सत्तार बोलत होते. सिल्लोड तालुक्यात कमी झालेल्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या परिस्थिती मध्ये वीज व पाणीपुरवठ्याबाबत संबधित यंत्रणेने लक्ष द्यावे अशी सूचनाही त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिली आहे.
अधिक वाचाशेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच- अब्दुल सत्तार
सिल्लोड व सोयगाव तालुक्यामध्ये ३० ते ३५ टक्यापेक्षा कमी आणेवारी सदृश्य परिस्थिती आहे. असंख्य अडचणी असताना आता आणखीन नवीन दुष्काळरुपी संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे सिल्लोड व सोयगाव तालुका ‘दुष्काळग्रस्त तालुका’ घोषित झालाच पाहिजे या मागणीसाठी आपण आंदोलन करणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच असे प्रतिपादन अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या शेतकरी आढावा बैठकीमध्ये …
अधिक वाचाप्राचार्य संचालनालय संरक्षण वसाहत पुणे, येथे विविध पदासाठी भरती.
प्राचार्य संचालनालय संरक्षण वसाहत पुणे, येथे विविध पदासाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेद्वारानी अधिक माहितीसाठी कृपया http://punecantonmentboard.org/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३० नोहेंबर २०१४ पूर्वी भेट द्यावी व जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच आपले अर्ज सादर करावेत. अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : The Principal Director, Defense Estates, Ministry of …
अधिक वाचाआ.सत्तार यांना गटनेतेपदी निवड करण्याची मागणी.
सर्व सामन्याचे नेते म्हणून अब्दुल सत्तारांना ओळखले जाते. औरंगाबाद,जालना व बीड या तीन जिल्ह्यातून कॉंग्रेस पक्षाचे एकमेव आमदार अब्दुल सत्तार निवडून आले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचा बुरुज अबाधित ठेवणाऱ्या अब्दुल सत्तार यांची कॉंग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करावी अशी मागणी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी पक्षश्रेष्ठी सोनियागांधी यांच्याकडे केली आहे.
अधिक वाचाआ. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक.
अत्यल्प झालेल्या पावसामुळे सिल्लोड व सोयगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून शेतकऱ्यांसमोर दुष्काळ आ वासून उभा आहे. ह्या दुष्काळी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी सिल्लोड येथील ‘नर्मदाबाई मंगल कार्यालय’ येथे आज सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन केले होते.
अधिक वाचादुष्काळसदृश परिस्थितीवर अब्दुल सत्तार यांची शेतकऱ्यांशी चर्चा.
सिल्लोड व सोयगांव तालुक्यात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी आ. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत सिल्लोड शहरातील नर्मदाबाई मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचाविविध जिल्ह्यामध्ये सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन.
औरंगाबाद भरती कार्यालय यांच्या अधिपत्याखाली नंदूरबार, हिंगोली, जालना नांदेड, बुलढाणा, परभणी औरंगाबाद, धुळे व जळगाव येथे सैन्य भरती मेळावा आयोजित केला आहे. इच्छुक उमेद्वारानी अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अन्य नोकरी संदर्भातील माहितीसाठी वेळोवेळी www.abdulsattar.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिक वाचासैन्य भरती मेळावा.
पुणे भरती कार्यालय यांच्या अधिपत्याखाली अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, पुणे येथे सैन्य भरती मेळावा आयोजित केला आहे. इच्छुक उमेद्वारानी अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अन्य नोकरी संदर्भातील माहितीसाठी वेळोवेळी www.abdulsattar.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिक वाचा